मुंबई जिल्ह्यातील अनेक गिरण्यातील, उद्योगांमधील, तसेच आस्थापनांतील कर्मचारी व गिरणी कामगार यांच्याकडे त्यांच्या कामाच्या वेळेच्या व्यतिरिक्त काही मोकळा वेळ मिळत असे. उदाहरणार्थ, जेवणाची सुट्टी, चहापानाची सुट्टी इत्यादी. अर्थातच, या फावल्या वेळेत ते दुर्मार्गांकडे वळत. ते कर्मचारी व गिरणी कामगार मद्यपान किंवा जुगार खेळण्याकडे आकर्षित व आसक्त होत. जेव्हा शासनाने अशा कामगारांकडे बारकाईने लक्ष दिले तेव्हा असे निदर्शनास आले कि ते चुकीच्या मार्गाला लागलेले आहेत. म्हणून असा निर्णय घेण्यात आला कि त्या कामगारांना फावल्या वेळेत काही सकारात्मक गतीविधींमध्ये व्यस्त करून ठेवावे.
या एकमेव उद्देशाने सर्व कामगार कल्याण मंडळांची स्थापना करण्यात आली.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.